आरोग्य

बाप रे! इडली खाता-खाता गेला जीव

  1. इडली हा भारतीयांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. दरम्यान, केरळमध्ये ओणम सणाच्या निमित्ताने इडली खाताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीने इडली खाण्याची स्पर्धा जिंकण्यासाठी एकावेळी तीन इडल्या गिळल्या, त्यामुळे एक इडली त्या व्यक्तीच्या घशात अडकली आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
    या बातमीमुळे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, कोणतेही अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने मृत्यू कसा होतो? आणि अन्न खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे? अन्न घशात अडकल्याने मृत्यू होऊ शकतो. घाईघाईने खाल्ल्याने अन्न श्वसननिलकेत अडकण्याचा धोका असतो. असे घडते कारण, जेव्हा आपण अन्न गिळतो तेव्हा अन्न गिळण्याच्या प्रक्रियेत नलिका स्वतःच बंद होते आणि त्यामुळे अन्न फूड पाईपद्वारे पोटात जाते, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती अन्न पटकन खाते, तेव्हा श्वसनमार्गास बंद होण्याची संधी मिळत नाही आणि अडकते. त्यामुळे गुदमरून व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत एस्पिरेट असे म्हणतात, जे अन्न श्वसननलिकेत अडकल्यामुळे श्वसन प्रणाली निकामी होते आणि मृत्यूचे कारण बनते.

Related Articles

Back to top button