खेळ
ब्रेकिंग! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

- भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये न्युझीलंड संघाचा पराभव करुन विजेतेपद मिळवले आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी दर चार वर्षांनी आयोजित केली जात आहे.
- पुढील चॅम्पियन्स ट्रॉफी 2029 मध्ये होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा आशियाला देशाला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे ही ट्रॉफी भारतात होणार आहे.
- भारतीय चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा संपूर्ण संघ चांगलाच फॉर्मात आहे. त्यामुळे येणारे सामने टीम इंडियासाठी आणखी महत्वाचे ठरणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटाकावल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूची जबाबदारी आणखी वाढली आहे.
- आयसीसीच्या भविष्यातील वेळापत्रकानुसार आयसीसी ट्रॉफी 2029 मध्ये आयोजित केली जाणार आहे.
- यजमान देश भारत असेल. जर ही स्पर्धा भारतात आयोजित केली गेली तर ती हायब्रिड असावा लागेल हे निश्चित आहे. पाकिस्तानी संघाचे सामने इतर कोणत्या तरी दुसऱ्या देशात हलवावा लागतील. जसे भारताचे सामने दुबईमध्ये खेळले जात होते, तसेच पाकिस्तानचे सामने बाहेरही खेळले जाऊ शकतात.



