- आशिया कप 2025 जिंकल्यानंतर टीम इंडियाला त्यांच्या ट्रॉफी आणि मेडलसह आनंद साजरा करता आला नाही. आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे आशिया कप ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंचे पदके घेऊन पळून गेले. या घटनेमुळे खळबळ उडाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला शेवटचा इशारा दिला आहे आणि त्याने भारताची ट्रॉफी आणि पदके लवकरात लवकर परत करावी, अशी मागणी केली आहे.
- टीम इंडियाने नक्वी यांच्याकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत आणि त्यांनी वारंवार भारताविरुद्ध भडकाऊ विधाने केली आहेत. टीम इंडियाचे क्रिकेटपटू एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार होते, परंतु नक्वी यांनी हे होण्यापासून रोखले. नक्वी भारताची आशिया कप ट्रॉफी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंची पदके घेऊन त्यांच्या हॉटेलच्या खोलीत पळून गेला.
- बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, आम्ही पाकिस्तानचे गृहमंत्री असलेल्या एसीसी अध्यक्षांकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतला. हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. नक्वी यांना ट्रॉफी आणि पदके त्यांच्यासोबत घेण्याचा अधिकार नाही. हे अत्यंत दुर्दैवी आणि खेळाच्या भावनेविरुद्ध आहे. आम्हाला आशा आहे की, ट्रॉफी आणि पदके लवकरात लवकर भारतात परत केली जातील. आम्ही नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी परिषदेत याचा निषेध करू.
निर्लज्जपणाची हद्द ! टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळाले पाकिस्तानचे गृहमंत्री
