स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही

कुंभमेळा आता समाप्तीकडे चालला आहे. जसजसे त्याच्या समाप्तीचे दिवस जवळ येत आहेत, तसतशी लोकांच्या श्रद्धेची लाट वाढत चालली आहे. याच वाढत्या गर्दीमुळे प्रयागराजमध्ये सध्या अभूतपुर्व ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली आहे. प्रयागराजला जाताना मध्य प्रदेशातील जबलपूर ते प्रयागराज या संपूर्ण 350 किमी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर लाखो वाहने अडकली आहेत. ती हळूहळू महाकुंभात पोहोचत आहेत. जबलपूरहून प्रयागराजला पोहोचण्यासाठी साधारणतः 5 ते 6 तास लागत असत, पण आता 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. तर रेवा गावाजवळ इतिसाहासातली सर्वात वाईट वाहतूक कोंडी झाली आहे.
कुंभमेळ्यात आत्तापर्यंत कोट्यवधी भाविकांनी शाहीस्नान केले. मात्र कुंभमेळा संपण्याची तारीख जवळ येऊ लागल्यावर मात्र भाविकांची विक्रमी गर्दी होऊ लागली आहे. राष्ट्रीय महामार्ग-30 वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. रेवा नंतर प्रयागराजला पोहोचण्यासाठी 2 तासांऐवजी 10-12 तास लागत आहेत. हा कदाचित इतिहासातील सर्वात लांब जाम आहे. जबलपूर ते प्रयागराज हे अंतर काहींना 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागूनही पूर्ण करता आलेले नाही.