क्राईम
१२ दिवसांपासून बेपत्ता असलेली अर्चना नेपाळमध्ये होती

- सध्या अर्चना तिवारीचे प्रकरण खूपच चर्चेत आहे. सात ऑगस्ट रोजी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी इंदूरहून निघालेली ही एलएलबीची विद्यार्थिनी गूढपणे गायब झाली आणि 12 दिवसांनी ती नेपाळ सीमेवर सापडली.
- काल सकाळी जेव्हा तिच्या मानलेल्या भावाने अर्चनाशी फोनवर संवाद झाल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांना दिली, तेव्हा तिच्यासोबत काहीतरी अनुचित घडण्याची भीती दूर झाली व कुटूंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रात्री उशिरा भोपाळ रेल्वेचे पोलिस अधीक्षक राहुल लोढा यांनी अर्चनाला सुखरूप ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
- अर्चना स्वतः या संपूर्ण योजनेची सूत्रधार होती. विद्यार्थी राजकारणात सहभागी असलेली अर्चना कुटुंबाच्या मर्जीनुसार लग्न करू इच्छित नव्हती. कुटुंबाने अर्चनाला लग्नासाठी अनेक स्थळे दाखवली पण अर्चना नेहमीच नकार देत असे आणि त्यामुळे घरात वारंवार भांडणे होत असत.
- इंदूरमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान अर्चना आणि सारांश यांची भेट झाली आणि येथूनच त्यांची मैत्री सुरू झाली. काही दिवसांपूर्वी अर्चना आणि तिच्या जवळच्या मैत्रिणींनी हरदा येथे बसून संपूर्ण योजना तयार केली होती. या योजनेत कॅब ड्रायव्हर तेजिंदरनेही महत्त्वाची भूमिका बजावली. तेजिंदर अनेकदा अर्चनासोबत बाहेर जायचा. ट्रेन प्रवासादरम्यान तेजिंदरही उपस्थित होता.



