ब्रेकिंग! राज्यात पावसाचा रेड अलर्ट जारी, जनजीवन विस्कळीत

Admin
1 Min Read
  1. राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
  2. आज सकाळपासूनच सोलापूर, पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, पालघर, गोंदिया, रायगड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. 
  3. पालघर, महाड-पोलादपूर, गोंदिया, पुणे, गोदिंया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नद्यांची पातळी वाढली आहे.
  4. मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट असून आज सकाळपासून मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला असून, मुंबई लोकल सेवा मात्र सुरळीत सुरू आहे. जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी हानी झाली आहे.
Share This Article