देश - विदेश
भारताच्या हल्ल्याची दाहकता हळूहळू दिसू लागली

- पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाच मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून या दशतवाद्यांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये मसूद अझरच्या दोन्ही मेहुण्यांसह पाच बड्या दहशवाद्यांचा खात्मा झाला आहे.
- खात्मा झालेल्या दहशतवाद्यांमध्ये मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल (लष्कर-ए-तैयबा), हाफिज मुहम्मद जमील (जैश-ए-मोहम्मद), मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब (जैश-ए-मोहम्मद), खालिद उर्फ अबू आकाशा (लष्कर-ए-तैयबा) आणि मोहम्मद हसन खान (लष्कर-ए-तैयबा) अशी भारताने सात मे रोजी केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या पाच मोठ्या दशतवाद्यांची नावे आहेत.



