विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावला

Admin
1 Min Read
  • सोलापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. एका अज्ञाताने चालत्या रेल्वेवर भिरकावलेल्या दगडामुळे पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. आरोही अजित कांगले असे पाच वर्षीय मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. कुलदैवताच्या यात्रेवरून सोलापूरला परतत असताना ही घटना घडली आहे. 
  • या चिमुकलीचे पालक विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने चालत्या रेल्वेवर एक दगड भिरकावला. यातच या आरोहीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
  • सोलापुरातील टिकेकरवाडी स्टेशनपासून काही अंतरावर ही गंभीर घटना घडली आहे. या घटनेनंतर चिमुकलीला उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 
Share This Article