महाराष्ट्र

बिग ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेबाबत नवा निर्णय

  • राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निकालांना कलाटणी मिळाली. मात्र आता या योजनेलाच कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. 
  • अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चार चाकी वाहन असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून यामुळे आता अशा अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीत नियमबाह्य आढळणारे अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आज प्रसार माध्यमांना दिली. 
  • दरम्यान राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या अर्ज छाननीवर भाष्य केले होते. तसेच जे निकषात बसणार नाहीत ते अर्ज बाद केले जातील, असे संकेत दिले होते. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला लाडक्या बहिणींची गरज नसल्याची टीका केली होती. तर याबाबत आलेल्या बातम्यांमध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले होते. 
  • मात्र, आता माहिती समोर आली आहे की, या योजनेतील १६ लाख अर्जांची छाननी होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधीपासून छाननी सुरू होती. त्यातील १६ लाख अर्जांची छाननी बाकी होती. ती आता पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे. या १६ लाख अर्जांपैकी पात्र अपात्र ठरवून लाभ दिला जाणार आहे.

Related Articles

Back to top button