क्राईम
तिहेरी हत्याकांडाने राज्य हादरले!

- भाडेकरुनी घर मालकाचे अख्खच्या अख्खं कुटुंब संपवल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तिहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करत मुसक्या आवळल्या आहेत.
- पालघरमध्ये एकाच घरात राहणाऱ्या या तिघांचीही हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या त्यांच्याच घरातील भाडेकरुने केल्यानं खळबळ उडाली. या ट्रिपल मर्डर केसचा छडा लावताना काळजाचा थरकाप उडवणारे खुलासे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
- आरोपी हा राठोड कुटुंबीयांचा घरात भाडेकरु म्हणून राहत होता. पालघरमध्ये झालेल्या ट्रिपल मर्डरच्या आरोपीला पोलिसांनी थेट यूपीच्या प्रयागराजमधून बेड्या ठोकल्या आहेत.
- पालघरमध्ये कारपेन्टिंगचे काम करणारा आरिफ अन्सारी याला झटपट पैसे कमवून श्रीमंत व्हायचं होतं. फर्निचर आणि कारपेन्टिंगच्या कामातून मिळणाऱ्या पैशात तो समाधानी नव्हता. त्यासाठी त्याने एक भयंकर डाव आखला. ज्या भाड्याच्या घरात तो राहत होता, तिथंच चोरी करण्याचा त्याने प्लॅनिंग केले.
- आरिफ फर्निचरच्या दुकानात काम करायचा. पालघरच्या वाडा तालुक्यातील नेहरोली इथं बोंद्रे आळीत तो राहायचा. तिथे राठोड यांच्या घरात त्याने भाड्याने राहण्यासाठी जागा घेतली होती. उत्तरप्रदेश येथून आलेला आरिफ अन्सारी पालघरमध्ये दिवसभर काम करायचा. पण त्याला हवे तितके पैसे काही मिळत नव्हते. त्यासाठी त्याने चोरीचा कट रचला.
- या हत्याकांडाचा पहिला दुवा होती… हातोडी..! आरिफने गतीमंद असलेल्या संगिताकडे हातोडी मागितली. तिला वाटले काम करण्यासाठी तो हातोडी मागतोय. पण त्याच हातोडीने त्याने संगीताच्या डोक्यावर घाव घातला.
- संगिताच्या ओरडण्याच्या आवाजाने तिची आई कांचन राठोड एकाएकी झोपेतून जागी झाली. ती संगिताच्या मदतीसाठी धावली. त्यावेळी चोरी पकडली जाईल या भीतीने आरिफने ती हातोडी संगिताच्या आईच्या डोक्यातही हाणली. यात दोघीही जागच्या जागी कोसळल्या.
- रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघींचेही मृतदेह ठिकाण्यावर लावण्यासाठी आरिफ धावपळ करत होता.. इतक्यात 72 वर्षीय मुकुंद राठोड यांच्या स्कूटरचा आवाज आरिफला आला.
- तो लागलीच घराच्या दरवाजा मागे लपला आणि त्याने योग्य वेळ पाहून हातोडीनेच मुकुंद यांच्याही डोक्यावर प्रहार केला. तिघांची हत्या करुन या भाडेकरुने घर मालकाचेच घर लुटले. ज्यात काही चांदीची नाणी आरिफला सापडली. ती नाणी घेऊन आरिफ बायको आणि मुलांसह प्रयागराजला पळाला.
- तिघांचे मृतदेह सापडल्यानंतर अख्खं पालघर हादरले. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आपला तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डेटा, मोबाईल लोकेशन आणि मॉडर्न टेकनॉलोजी वापरली.
- सगळी यंत्रणा कामाला लागली. त्यातून या ट्रिपल मर्डरचा मुख्य आरोपी आरिफ हा प्रयागराजला पळाल्याचे पोलिसांना कळले. पण इथून पुढे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठं आव्हानच होते. भाडेकरु ठेवताना राठोड कुटुंबाने पोलीस व्हेरिफिकेशन केले नव्हते. त्यामुळे आव्हाने आणखी वाढली.
- अन्सारीने प्रयागराजमध्ये पोहोचल्यानंतर बायकोला गावात सोडले. मोबाईल बंद केला. नंतर त्याने त्याच्या मोबाईल हॅन्डसेटमधलं सिम कार्डही बदलले. तो रात्रीचाच फक्त फोन सुरु करत होता. पोलिसांनी एक-एक धागा जोडत अन्सारीपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केला.
- अखेर पालघरच्या एसटीएफ टीमने यूपी पोलिसांची मदत घेतली. त्यात आरिफ गावाबाहेर लपून बसल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अखेर सापळा रचून आरिफला जाळ्यात अडकवले आणि त्याला प्रयागराजमधूनच अटक केली. या अटकेनंतर आरिफच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा समोर आला.
- हे सगळं हत्याकांड 17 ऑगस्ट 2024 रोजी घडले. ती रात्र आरिफ बायको मुलांसह एका मित्राच्या घरीच राहिला होता. पण त्याआधी काय भयंकर कांड झाला, याचा कबुली जबाबही आरोपी आरिफने पोलिसांना दिला.
- राठोड पती-पत्नी आणि त्यांची दिव्यांग मुलगी यांची आरिफने हत्या केली. हत्येनंतर सर्व मृतदेह आरिफने बिछान्याने सरकवले आणि गादीने झाकले. नंतर त्याने एक ट्रंक रिकामा केला आणि मृतदेह त्यात भरले. मग रक्ताने माखलेली फरशी स्वच्छ केली. त्यानंतर अन्सारीने घरात पैसे किंवा मौल्यवान काही वस्तू सापडते का पाहिले.
- त्यात त्याला फक्त काही चांदीची नाणी सापडली. तेवढीच सोबत घेऊन तो घरी आला. ही नाणी त्याने विकल्यानंतर त्या बदल्यात त्याला फक्त 2,100 रुपये मिळाले, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.