बिजनेस
ब्रेकिंग! सरकारचे खास मिशन आणि तुमचे टेन्शन मिटणार

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत बजेट सादर केले. भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचे हे पहिले पूर्ण बजेट होते.
- या बजेटमध्ये सितारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. तसेच खाद्यतेलांच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सहा वर्षांच्या मिशनची घोषणा केली.
- भारत खाद्यतेलांच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. तेल आयात करावे लागते. यासाठी अब्जावधी रुपये खर्च करावे लागतात. यामागचे सर्वात मोठं कारण म्हणजे भारतात तेलाचे उत्पादन अतिशय कमी आहे. या गोष्टी विचारात घेऊन केंद्र सरकार यावर काम करत आहे. यात सुधारणा करून देशाला खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याचे उद्दीष्ट सरकारने निश्चित केले आहे. यासाठी सरकार सहा वर्षांत एक खास मिशन सुरू करणार आहे. या मिशनची घोषणा आज अर्थमंत्री सितारामण यांनी केली.
- टॅक्स, पॉवर, अर्बन डेव्हलपमेंट, मायनिंग, फायनान्शिअल सेक्टर आणि रेग्युलेटरी पॉलिसी या सहा प्रमुख क्षेत्रांत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे अर्थमंत्री सितारामण यांनी सांगितले.