महाराष्ट्र

बिग ब्रेकिंग! मनोज जरांगेंचा शेवटचा इशारा

  • मुंबई हायकोर्टाच्या भूमिकेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना मुंबईकरांना त्रास न देण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांना गावी परतण्याचा आदेश देत आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. 
  • मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. कुणाच्या सांगण्यावरून रस्त्यावर हुल्लडबाजी करू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. जे आंदोलक नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांनी लगेच आपल्या गावाकडे परत जावे, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. जरांगे यांनी म्हटले की, मी शेवटचे सांगतो आहे, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. जर तसे घडले तर त्याला सोडणार नाही.
  • जरांगे यांनी आंदोलकांना सांगितले की, मुंबईच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या तात्काळ आझाद मैदानाशेजारील क्रॉस मैदानात लावा आणि तिथेच झोपा. त्यांनी पुढे म्हटले, मुंबईकर आपल्याला मदत करत आहेत, त्यामुळे त्यांना त्रास होईल असं कोणतही कृत्य करू नका. जर माझ्या आंदोलकांमुळे कुणालाही त्रास झाला असेल तर मी त्यांची माफी मागतो.

Related Articles

Back to top button