राजकीय

ब्रेकिंग! दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे म्हणाले,

  • राज्यात अनाकलनीय निकाल लागला. या निकालामागील गुपीत शोधून काढावे लागेल. हा निकाल जनतेला मान्य आहे का? मान्य असेल तर काही बोलणार नाही. निवडणुकीत यश मिळवल्याबद्दल मी विरोधकांचे अभिनंदन करतो आणि राज्यातील पुढील मुख्यमंत्री भाजपचा असेल, अशी अपेक्षा करतो. राज्यात महागाई वाढली, सोयाबीनला भाव नाही आणि महिला असुरक्षित आहेत, तरीही जनतेने भाजपची निवड केली? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्णपणे अनपेक्षित आणि न समजण्याजोगे आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. लोकसभा निवडणुकीनंतर चार महिन्यांत परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात कशी बदलू शकते, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. कोविडकाळात कुटुंबप्रमुख म्हणून माझे म्हणणे ऐकणारा महाराष्ट्र माझ्याशी असे वागेल, यावर विश्वास बसत नाही. पण आम्ही महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढा देत राहू, असेही ठाकरे म्हणाले.

Related Articles

Back to top button