मोठी बातमी! दिवाळीनंतर महापालिका निवडणुकांचा धुरळा

Admin
1 Min Read
  • राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर मार्गी लागणार आहेत. दिवाळीनंतर लगेचच राज्यात निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू होणार आहे. 
  • सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याची योजना आखली आहे. या निर्णयामुळे विकासकामांवर आचारसंहितेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयोगाने निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
  • पहिला टप्पा: नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका.
  • दुसरा टप्पा: त्यानंतर नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका.
  • तिसरा टप्पा: तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात जानेवारी २०२६ मध्ये मुंबई, पुणे, सोलापूरसह २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
  • या प्रस्तावामुळे, मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुकीसाठी तयारीला काहीसा वेळ मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत या महापालिकांच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Share This Article