महाराष्ट्र

ब्रेकिंग! रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी

  • रेशन कार्डाला केवायसी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. अनेक शिधापत्रिकाधारकांना केवायसी पूर्ण करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने ही मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही अंतिम संधी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 
  • मागील काही महिन्यांपासून राज्यभरात रेशन कार्डधारकांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. विभागीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही मुदतवाढीची चौथी वेळ आहे आणि यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे सर्व रेशन कार्डधारकांनी ३० एप्रिलपर्यंत आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
  • या अंतिम मुदतीनंतर ज्या कार्डधारकांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल, त्यांना मिळणारे मोफत किंवा अनुदानित धान्य बंद केले जाईल, तसेच त्यांचे रेशन कार्ड रद्द होण्याचीही शक्यता आहे.

Related Articles

Back to top button