राजकीय

ब्रेकिंग! महाविकास आघाडीचा महायुतीवर गंभीर आरोप

  1. मतदानाला संपूर्ण एक महिना बाकी आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर गंभीर आरोप केला आहे. 
  2. प्रत्येक मतदारसंघात दहा हजार मतांची फेरफार सुरु आहे. मतदार यादीत गोंधळ निर्माण करण्याचे षडयंत्र उघड झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मतदारसंघात भाजपची टीम कामाला लागली आहे. त्याचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
  3. आम्ही या मतदार यादीबद्दल राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले. दरम्यान राज्यातील निवडणूक पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे.

Related Articles

Back to top button