खेळ

भारत – न्यूझीलंड सामन्यात फुल्ल ड्रामा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले.

भारतीय संघ दुसऱ्या डावात 462 धावांवर ऑलआऊट झाला. मात्र किवी संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आल्यानंतर खेळ अवघ्या चार चेंडूनंतर थांबवण्यात आला. पंचांनी खराब प्रकाशामुळे हा निर्णय घेतला. 

भारतीय कर्णधार रोहित शर्माला पंचांचा हा निर्णय आवडला नाही. या निर्णयामुळे तो संतापलेला दिसला. त्याने यावरून बराच वेळ पंचांशी वाद घातला. मात्र त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं सामना पुन्हा सुरू होण्याची शक्यता संपुष्टात आली. 

न्यूझीलंडचा संघ जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा ढगाळ वातावरणामुळे चेंडू खूप स्विंग होत होता. जसप्रीत बुमराह शानदार गोलंदाजी करत होता. त्याच्या एका बॉलवर रिव्युव्ह घेण्यात आला होता, ज्यात फलंदाज थोडक्यात वाचला. मात्र, चार चेंडू टाकताच पंचांनी खराब प्रकाशामुळे सामना थांबवला. 

आकाशात काळ्याकुट्ट ढगांमुळे प्रकाश कमी झाला होता. यावर भारतीय कर्णधार रोहित नाखूश दिसला. यावेळी टीम इंडियाने गोलंदाजी केली, तर त्यांना विकेट मिळण्याची शक्यता अधिक आहे, असे त्याला वाटत होते. या कारणावरून त्याने पंचांशी बराच वेळ वाद घातला. मात्र पंचांनी रोहितचे ऐकले नाही आणि खेळ थांबवला. 

Related Articles

Back to top button