क्राईम
राज्यात खळबळ, भर दिवसा बारावीच्या विद्यार्थ्याचा खून
- राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, पुणे- बारामती शहरातील मध्यवर्ती तुळजाराम चतुरचंद (टी. सी) महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर दोघाजणांनी चाकूने हल्ला करून खून केला आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजता घडली. महाविद्यालय सुरू असतानाच आवारात अल्पवयीनचा खून झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थव पोळ (वय १७) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अर्थव हा बारावीत शिकत होता. कॉलेजच्या बाहेर आज सकाळी सर्व विद्यार्थी जमले होते. त्यावेळी अर्थव व त्याच्याच वर्गात शिकत असलेल्या काही तरुणांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपींनी अथर्ववर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार एक महिन्यांपूर्वी अर्थव आणि आरोपींमध्ये बाईकला कट मारण्यावरुन वाद झाला होता. या कारणावरून आज सकाळी त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून अथर्वची हत्या करण्यात आली आहे. यानंतर आरोपी पळून गेले. अर्थवला तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.