क्राईम

मी आयुष्य संपवतोय, घरातून निघालेल्या पतीचा पत्नीला मेसेज

पती-पत्नीमधील वादातून भांडण झाले. त्यामुळे चिडलेले श्रीकांत पुणे धनकवडीतून थेट वरंधा घाटात आले. त्यानंतर त्यांनी जे केले, त्यामुळे त्यांची पत्नी हादरून केली. श्रीकांत यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला, भांडण कोणत्या मुद्द्यावरून झाले की पत्नी आणि दोन लहान मुलींना सोडून जाण्याचा निर्णय श्रीकांत यांनी घेतला, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत. दरम्यान, श्रीकांत यांना वाचवायला आलेल्या पोलीस आणि रेस्क्यू टीमला त्यांचा मृतदेह शोधावा लागला. रविवारी रात्री श्रीकांत यांचा मृतदेह सापडला. मात्र, या सगळ्या प्रकरणातून एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
श्रीकांत विलास देशमुख हे पुण्यातील धनकवडी येथे राहत होते. काल त्यांचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात ते कार घेऊन निघाले आणि थेट रायगड जिल्ह्यातील वरंधा घाटात पोहोचले. तिथून पत्नीला त्यांनी लोकेशन पाठवले. सोबतच मी आत्महत्या करत आहे, असा मेसेज पाठवला.

हा मेसेज पाहून त्यांची पत्नी हादरून गेली. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लगेचच भोर पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने वरंधा घाटातील त्या लोकेशनवर धाव घेतली. सोबत रेस्क्यू टीमही होती. मात्र, तोपर्यंत खेळ संपला होता.

Related Articles

Back to top button