क्राईम

पिकअप अन् ईकोची जोरदार धडक, वाहनांचा अक्षरश: चक्काचूर

राज्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाजवळ काल रात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
शिंदखेडा तालुक्यातील काहीजण नरडाणा येथे भागवत कथा ऐकण्यासाठी गेले होते. भागवत कथा संपल्यानंतर आपल्या घरी परतत असताना रात्रीच्या वेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या इको गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा चक्काचूर झाला.
या अपघातात चार चाकी वाहनांमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार पिकअप वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यातूनही हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Related Articles

Back to top button