राजकीय

जयंत पाटील यांचा धमाका

विधानसभेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीत हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल ते आधी जाहीर करा, अशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी आहे. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असा जाहीर करता येत नाही. संख्याबळाच्या अधारावर मुख्यमंत्री ठरवला जातो, असे वक्तव्य केले. त्यामुळे महाविकास आघाडीत काही अलबेल नाही असे चित्र आहे.
या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच आहे किंवा मविआत मतभेद आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, पवारांच्या मनात तीन नावे आहेत. ती फडणवीस यांना माहीत आहेत. म्हणजे पवार आणि फडणवीस यांच्यात संवाद आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी चांगलाच धमाका उडवला आहे.
साधं लॉजिक पहा, पवारांच्या मनात तीन नावे आहेत. ती फडणवीस यांना माहीत आहेत. म्हणजे पवार आणि फडणवीस यांच्यात संवाद आहे का? अजितदादा आणि शिंदे यांना अस्वस्थ केले जात आहे. ते चिंतीत होतील. हा गुमराह करण्याचा प्रयत्न आहे, असा मोठा दावा पाटील यांनी केला.

Related Articles

Back to top button