क्राईम

वाऱ्याच्या वेगाने बाईकवरून निघाले ; पुढे घात झाला

  1. राज्यात अलीकडे विविध भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान मुंबईतल्या आरे जंगलातील बिरसा चौकात काल रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. वाऱ्याच्या वेगाने जाणारी बाईक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. अपघात इतका भीषण होता, की बाईकचा चक्काचूर झाला. 
  2. या घटनेत दोघांचा घटनास्थळीच तर एकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. राधेश्याम अशोक दावंडे (वय 34) विवेक लालमन राजभर (वय 24) आणि रितेश शिवाजी साळवे (27 वर्ष) अशी अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. 
  3. याप्रकरणी आरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही तरुण बाईकवरून सुसाट वेगाने जात होते. तिघांपैकी एकाच्याही डोक्यावर हेल्मेट नव्हते. दरम्यान, आरे जंगलातील बिरसा चौकात त्यांची बाईक आली. 
  4. काळ्याकुट्ट अंधारात चालकाचा ताबा सुटल्याने बाईक थेट विजेच्या खांबाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, परिसरात मोठा आवाज झाला. बाईकची खांबाला धडक बसताच तिन्ही तरुण 10 ते 15 फुट हवेत उडाले. यातील दोन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

Related Articles

Back to top button