क्राईम

तीन महिन्यापूर्वीच लग्न

अवघ्या तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या एका जोडप्याने झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली. काल दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. वैभव आमले आणि स्नेहा आमले अशी मृत पती पत्नीची नावे आहेत.
त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून घटनेचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव आणि स्नेहा हे संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रहिवासी होते.
तीन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही पुणे शहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. काही दिवसांपूर्वी दोघेही अचानक गावी निघून आले. काल सायंकाळच्या सुमारास त्यांनी मुळा नदीच्या जवळील मांगमळीत झाडाला गळफास घेतला.

Related Articles

Back to top button