खेळ

ब्रेकिंग! भारताने वर्ल्डकप जिंकलेल्या शहरात चक्रीवादळ

टी 20 विश्वकप विजेता टीम इंडिया चक्रीवादळामुळे अडकली आहे. ज्या बारबाडोस शहरात वर्ल्डकप स्पर्धेचा फायनल सामना झाला, त्या शहरात चक्रीवादळ आले आहे. यामुळे भारतीय खेळाडू हॉटेलमध्येच अडकले आहेत. आजच टीम इंडिया बारबाडोस शहरातून न्यूयॉर्क शहरात पोहचणार होती. परंतु खराब वातावरणामुळे त्याचे विमान रद्द करावे लगाले. विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. आता खेळाडूंना आणण्यासाठी बीसीसीआय विशेष विमान पाठवणार आहे. हवामान सुधारल्यानंतर बारबाडोस विमानतळावरील कामकाज सुरु होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया एका विशेष चार्टर्ड विमानाने थेट दिल्लीला येणार आहे.

बारबाडोसमधून बाहेर पडण्यासाठी टीम इंडियाला आज संध्याकाळी उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टीम इंडियासोबत असणारे कर्मचारी बारबाडोसवरून थेट दिल्लीला जातील. यामुळे भारतीय संघ तीन जुलैपर्यंत देशात दाखल होणार आहे. बारबाडोस विमानतळ बंद करण्यात आले आहे. आता येथे संचारबंदीसारखी परिस्थिती आहे. कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. 

Related Articles

Back to top button