राजकीय

ब्रेकिंग! कॉंग्रेसमध्ये मोठी खळबळ!

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे आत्मपरिक्षण सगळ्याच पक्षातील नेत्यांकडून केले जात आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह आता कॉंग्रेस पक्षातदेखील मोठे बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच राज्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पत्तादेखील कट करून दुसऱ्या फळीतील नेत्यांकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना पक्षाने राज्यात तेरा जागा लढवल्या. सांगलीत विशाल पाटलांच्या रूपात कॉंग्रेसचा बंडखोर विजयी झाला. त्यामुळे महाविकास आघाडीत कॉंग्रेसचे महत्व वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीची कामगिरी चांगली झाली. त्यानंतर आता कॉंग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेसचे जवळपास अर्धा डझनहून अधिक प्रदेशाध्यक्ष, काही राज्यांचे प्रभारी सरचिटणीस बदलण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात कामगिरी चांगली झाली. पण यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वाटा नेमका किती, हा प्रश्न आहे. कॉंग्रेसच्या यशात केंद्र सरकारविरोधातील नाराजीचा मोठा वाटा आहे. कॉंग्रेसच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी आपापली कामगिरी चोख बजावल्याने पक्षाला दणदणीत यश मिळाले. त्यामुळे कॉंग्रेसच्या विजयात दुसऱ्या फळीतील नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी यापैकी एखाद्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकते.

Related Articles

Back to top button