राजकीय

ठाकरेंचा अचानक मोठा निर्णय

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कुरबुरी होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांविरुद्ध उभी ठाकल्याचे स्थिती निर्माण झाली होती. आज अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

त्यातच आता कोकण पदवीधर निवडणुकीतून ठाकरे गटाने माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. याबाबतची माहिती स्वत: संजय राऊत यांनी दिली आहे.
कोकण पदवीधरची जागा ही काँग्रेसला मिळत आहे. काल रात्री आमची याबाबत चर्चा झाली. त्यात नाना पटोलेदेखील सहभागी होते. प्रत्येक चर्चेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलेच पाहिजे असे नाही. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करतो. त्यानुसार किशोर जैन यांची उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे, असे राऊत यांनी सांगितलं आहे. पटोले हे मोठे नेते आहेत. ते यापेक्षा मोठे नेते व्हावेत, ते आमचे मित्र आहेत. मुंबईचा पदवीधर मतदार संघ गेली 40 वर्षे शिवसेना जिंकत आहे, ती आमची परंपरागत जागा आहे. मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ आमची सेटिंग जागा आहे, असे म्हणत या जागेवर फार चर्चा करून उमेदवारी द्यायची गरज नव्हती, असेही राऊत म्हणाले.

Related Articles

Back to top button