राजकीय

ब्रेकिंग! ‘शहजादे’ घाबरुन वायनाडमधून रायबरेलीत

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीच्या जागांसाठी उमेदवारांची आज घोषणा केली. रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठीतून किरोशीलाल शर्मा यांची उमेदवारी आज जाहीर झाली असून या बाबत काँग्रेसने ट्विटरवर माहिती दिली आहे.

दरम्यान राहुल यांनी कॉँग्रेसच्या पारंपारिक जागेवरून न लढता रायबरेली येथून लढण्याचा निर्णय घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल यांच्यावर जहरी टीका केली आहे. मोदी आज हे पश्चिम बंगालच्या वर्धमान- दुर्गापूर येथे प्रचारसभा घेत असून त्यांनी गांधी घरण्यावर टीका केली.
मोदी म्हणाले, मी आधीच सांगितले होते की वायनाडमधील पराभवाच्या भीतीने शेहजादे यांनी स्वतःसाठी दुसरी जागा शोधली आहे. त्यांना अमेठीतून पळ काढून रायबरेलीची जागा निवडावी लागली आहे. हे लोक तुम्हा लोकांना घाबरू नका, असे सांगतात. मात्र, त्यांना मीच घाबरू नका, लढा असे सांगतोय.
मोदी पुढे म्हणाले, यावेळी काँग्रेसच्या जागा पूर्वीच्या तुलनेत कमी होणार आहेत. आता देशाला हे देखील समजू लागले आहे की, हे लोक निवडणुका जिंकण्यासाठी लढत नाहीत, ते केवळ देशाचे विभाजन करण्यासाठी निवडणुक लढत आहेत.

Related Articles

Back to top button