राजकीय
ब्रेकिंग! फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं?
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत.
देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान,
देवेंद्र फडणवीसांना डावलून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का करण्यात आले ? क्षमता असूनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर का बसवण्यात आले ? पहिल्या क्रमांकाचा पक्ष असूनही भाजपाने हा त्याग का केला? हे पाऊल उचलण्यामागे भाजपाची रणनीती काय होती? या प्रश्नाचे उत्तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत दिले आहे. भाजपाच्या जास्त जागा असूनही महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्याग केला. आम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून असे केले, असे काहींना वाटत होते.
पण असे नाही. आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो, आमच्यासाठी जगत नाही, हे आम्ही महाराष्ट्राला सांगितले. त्यामुळे सहानुभूती आमच्या बाजूने आहे. इतका मोठा पक्ष, एक यशस्वी मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री बनून, एक प्रकारे स्वत: चा सन्मान सोडून आज भाजपा फक्त महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी ही भूमिका घेत आहे. एकंदरित महाराष्ट्राच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला असून फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही स्वत:ला यशस्वी सिद्ध केल्याचे मोदी म्हणाले.