राजकीय

उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य यांनी CM होण्याचा रचला होता डाव

भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तुमच्या मालकाच्या मुलाला बघून जेव्हा मी म्याऊ म्याऊ असा आवाज काढला होता. तेव्हा तुमच्या मालकांना बर्नोल का लावावं लागलं?, त्या रागापोटी दीड महिने माझ्यावर खोटी केस टाकून मला आत का टाकण्यात आलं?, तुमच्या मालकाचा मुलगा वाघाची डरकाळी देतो का?, मग त्यांना बघून म्याऊ म्याऊ न करता वाघाची डरकाळी फोडायची का?, असा सवाल नितेश यांनी उपस्थित करत आदित्य यांच्यावर टीका केली.
राऊत हे नेमकं काय बोलतात ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि विनायक राऊतांनी त्यांच्या घरी जाऊन ऐकावं. त्यांच्या मनाचं परिवर्तन होतंय का ते बघा, ते लोकांची भूमिका मांडत आहेत. उद्धव ठाकरेंचे आदेश त्यांच्या मातोश्रीवरील शिपाई सुद्धा मानत नाहीत. शिपाई सोडा आदित्य ठाकरे तरी त्यांचे आदेश मानतात का?, जेव्हा उद्धव ठाकरे हे मानेवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात दाखल होते.
तेव्हा आदित्य, वरूण सरदेसाई आणि त्यांची टोळी दाओसच्या नावाने मजा मारत होते. माझ्या वडिलांची तब्येत बरी होणार नाही, म्हणून आदित्य यांनी स्वत: मुख्यमंत्री बनण्याचे षडयंत्र रचले. तेव्हा त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे हे सर्व प्रकरण थांबलं, असं म्हणत नितेश यांनी आदित्य यांच्यावर गंभीर आरोप केले.

Related Articles

Back to top button