ब्रेकिंग! लाडक्या बहिणींना सुखद धक्का

सध्या निवडणूक निकालानंतर लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जाची छाननी होणार असून अपात्र महिलांचे अर्ज बाद होतील, अशी भूमिका सरकारने घेतल्याचे समजते. तसेच तक्रार आलेल्या अर्जांची नव्याने छाननी केली जाईल. अर्जात काही त्रुटी, तफावत आढळल्यास तसेच नियमात बसत नसलेले अर्ज बाद केले जातील असेही सांगण्यात येत आहे. आता या सर्व गोष्टींवर आता राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
सध्यातरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही. मात्र मी जेव्हा मंत्री होते, त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जे लाभार्थी आहेत, त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना याआधीच अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना निकषात बसत नसूनही प्रतिमहिना दीड हजार रुपये लाभ दिला जात आहे, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे तक्रार आलेल्या अर्जांची नव्याने छाननी केली जाणार आहे.
तसेच अर्जामध्ये तफावत आढळल्यास, चुकीची माहिती दिली गेली असल्यास अर्ज बाद केला जाईल, असे सांगण्यात येत आहे. यासह अर्जदार महिला सरकारने घालून दिलेल्या नियमांत बसत नसेल, तरीदेखील अर्ज बाद केला जाईल, असे सांगितले जात आहे. पण अद्याप तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे तटकरे यांनी सांगितले.