खेळ

मोठी बातमी! सेमी फायनलमध्ये टीम इंडिया गिअर बदलणार  

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतीय क्रिकेट संघाने जबरदस्त एंट्री केली. आपल्या ग्रुप दोनमध्ये अव्वल स्थान राखणाऱ्या भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी मुकाबला होणार आहे. इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलचा सामना गुरूवारी खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड यांनी खास तयारी केली आहे.

द्रविडने सांगितले, ॲडलेडच्या परिस्थितीनुार भारतीय प्लेईंग 11 मध्ये बदल केले जातील. अशातच लेग स्पिनर युझवेंद्र चहलला प्लेईंग 11मध्ये संधी मिळू शकते. कारण ॲडलेडची पिच साधारणपणे स्लोअर बॉलर्सना मदतीची ठरते. सोबतच अनुभवी क्रिकेटर विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकही संघात परतू शकतो. ऋषभ पंतला पुन्हा बेंचवर बसवले जाऊ शकते.

Related Articles

Back to top button