खेळ

सेमीफायनल पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

भारतीय संघाला 10 नोव्हेंबर गुरुवारी टी-20 विश्वचषकचा उपांत्य सामना खेळायचा आहे. उपांत्य सामन्यात भारतासमोर बलाढ्य इंग्लंड संघाचे आव्हान आहे. संघ या सामन्यासाठी एडिलेड ओव्हलवर दाखल झाला असून कर्णधार रोहित शर्माच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. सेमीफायनल पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

रोहित विश्वचषकात वैयक्तिक काही खास खेळी करू शकला नाही. पण नेतृत्वाच्या बाबतीत त्याची आकडेवारी जबरदस्त राहिली आहे. त्याच्याच नेतृत्वात संघाने चालू विश्वषचषक स्पर्धेत देखील चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संघ ग्रुप दोनमध्ये भारतीय संघ 8 गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहिला आहे.

Related Articles

Back to top button