ब्रेकिंग! राज्यात पुन्हा निवडणुका

राज्यात येत्या तीन ते चार महिन्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. याची तयारी देखील करायची आहे. जसा महायुतीने महाविजय विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मिळवायचा आहे. त्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेतून केले. आज साईनगरी शिर्डीत भाजपच्या अधिवेशनामध्ये फडणवीस बोलत होते.
चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण समाजातील घटकांसाठी सुरू केलेल्या घटना शेवटपर्यंत सुरू राहणार आहेत. संघटनेला सरकारसोबत समर्थन करावे लागेल. मी हात जोडून विनंती करतो की, आपली संस्कृती इतरांपेक्षा वेगळी आहे. मंत्रालयात समाजातील कामे घेवून या. विनाकारण येवू नका, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे. एक है तो सेफ है, असा मंत्र मोदीजींनी दिला आहे. सगळ्या समाजाला घेवून आपल्याला पुढे जायचे आहे. आपल्याला महाराष्ट्रात परिवर्तन करायचे असल्याचे फडणवीस म्हणाले.



