क्राईम
दोन कोटींसाठी चेतनचे अपहरण अन् गाडीने केला घात
- दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या सात वर्षीय चेतनचे कारमधून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केले. अखेर अपहरण झालेला मुलगा सुखरुप सापडला असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. जालना येथील भोकरदन शिवारातून मुलाला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
- अपहरण केलेल्या चेतनची सुटका 24 तासाच्या आत करण्यात आली आहे. पोलिसांनी मुलांसह अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. दोन कोटीच्या खंडणीसाठी काल रात्री आठ वाजता अपहरण केले होते . 15 मिनिटांतच सुनील यांच्याशी संपर्क साधून खंडणीची मागणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. काल रात्री 8.45 वाजता एन-4 मध्ये ही घटना घडली.
- समोर आलेल्या माहितीनुसार, अपहरण झाल्यानंतर बिल्डर तुपे यांना खंडणीसाठी फोन आला. तात्काळ त्यांनी पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी देखील तपास सुरू केला. अपहरणकर्ते ज्या गाडीत चेतनला घेऊन गेले. त्या गाडीचा भोगरदन तालुक्यात अपघात झाला. हा अपघातच पोलिसांसाठी मोठा क्लू ठरला. कारण गाडीचा अपघात झाल्यामुळे अपहरणकर्ते जास्त दूर जाऊ शकले नाहीत.
- त्यांनी जालन्यात ब्रह्मपुरीजवळ थांबण्याचे ठरवले. या अपघातात ड्रायव्हर जखमी झाल्याने त्याला भोगरदनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावरून पोलिसांना तपासाची चक्रे फिरवली. ब्रह्मपुरी गावाजवळ अपहरणकर्ते मुलाला शेतात घेऊन बसल्याचे आढळले. त्यावेळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुलगा सध्या सुखरूप आहे.