महाराष्ट्र

शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा मज्जासंस्थेवर हल्ला

  • राज्यात गुलियन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने धुमाकूळ घातला आहे. सध्या महाराष्ट्रात या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळले आहेत. यातील 14 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत.
  • दरम्यान हा आजार नेमका काय? या आजाराची लक्षणे काय? कशी काळजी घ्याल? याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे.
  • गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जिबिएस हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. काही हजारो लोकांपैकी एकाला हा आजार होतो. एखादा विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे हा आजार होत असल्याचा अंदाज आहे. बहुतांश आजारात जर एखाद्या रोगाने हल्ला केला, तर आपली रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण हा रोग असा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते. या रोगाची लागण झाल्यानतंर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. यात नसांना प्रभावीपणे सिग्नल पाठवता येत नाहीत. तसेच मेंदूला सूचनांचे पालन करणेदेखील स्नायूंना शक्य होत नाही आणि तसेच इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात.
  • महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या आजाराची लक्षणे आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दल एक पत्रक शेअर केले आहे. 
  • आजाराची लक्षणे-
  • अचानक पाय किंवा हाताला कमजोरी येणे, लकवा मारणे, अचानकपणे चालताना त्रास होणे, शरीर कमजोर झाल्यासारखे वाटणे, खूप दिवस डायरियाचा त्रास होणे, हातापायाला मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होतात, हाता- पायांतले त्राण जातात,
  • श्वास घेताना किंवा गिळायला त्रास होतो. हा आजार कोणत्याही वयातील व्यक्तींना होतो.
  • काय काळजी घ्याल?
  • आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा आजार फारच दुर्मिळ असल्याने याबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांनी पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. दररोज पिण्याचे पाणी बदलावे. तसेच पाणी उकळून प्यावे. यासोबतच नेहमी स्वच्छ आणि ताजे अन्न खावे. यामुळे तुम्हाला पोषकतत्त्व मिळतात. तसेच वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या. अस्वच्छ ठिकाणी, रस्त्यावरचे किंवा उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.

Related Articles

Back to top button