क्राईम

विवाहित प्रेयसीचा लग्नासाठी हट्ट

  • राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान विरार येथील एका रिक्षाचालकाने किरकोळ वादातून विवाहित प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी ३४ वर्षीय आरोपीला अटक केली. मृत महिलेचा पती कामावर आणि मुले शाळेत गेली असताना ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
  • धनश्री आंबेडकर (वय ३२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून ती पती रुपेश (वय, ३७) आणि मुलांसोबत राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि मुले गेल्यानंतर आरोपी कदम हा सकाळी धनश्रीच्या घरी गेला. त्यानंतर दुपारी धनश्री बेशुद्ध असल्याची माहिती शेजाऱ्यांना दिली. धनश्रीला जवळच्या संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर आरोपी कदमने घटनास्थळावरून पळ काढला.
  • धनश्रीचे कदम याच्यासोबत गेल्या पाच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती रुपेशने दिली. सहा महिन्यांपूर्वी कुटुंबीयांनी धनश्री आणि कदमला एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र, तरीही हे दोघे कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध एकमेकांना भेटत राहिले. दरम्यान, पोलिसांनी हत्येमागचे कारण विचारले असता कदम म्हणाला की, धनश्रीने लग्नाचा आग्रह धरल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपी कदमने धनश्रीचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली.

Related Articles

Back to top button