महाराष्ट्र

ब्रेकिंग! ठाकरे गटाचा एकला चलो रे…की काँग्रेस स्वबळावर?

हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटायला सुरूवात झाली आहे. सामनाच्या अग्रलेखामधून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. यावरून महाविकास आघाडीत आता संघर्ष पेटायला सुरवात झाली आहे. त्यावरुन आता संजय राऊत बैठकीला आहेत, तर त्यांना बैठकीत विचारतो की, त्यांनी अग्रलेख लिहिला हा मुद्दाम लिहिला की त्यांनी वस्तूस्थिती मांडली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्रि‍पदावरून ठाकरे गट आग्रही झाला आहे. हरियाणा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. हरियाणाचा पराभव हा दुर्दैवी आहे. इंडिया आघाडीचा विजय जम्मू काश्मीरमध्ये झाला. हरियाणात जर इंडिया आघाडी झाली असती, त्यात सपा, आप, एखादी जागा शिवसेना, राष्ट्रवादीला मिळाली असती तर त्याचा परिणाम निकालात झाला असता, असे सांगत राऊतांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. काँग्रेसने स्वबळाची भूमिका असेल तर तसे जाहीर करावे, असे राऊत म्हणाले.

Related Articles

Back to top button