राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारविरुद्ध महाविकास आघाडीकडून आज “जोडे मारो आंदोलन” पार पडत आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत या मोर्चाचा मार्ग ठरवण्यात आला आहे. या मोर्चाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून त्यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.
माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे, नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्धल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेले आहे.
माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे, नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्धल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेले आहे.
त्यासंदर्भात कॉंग्रेसला माफी मागायला लावणार का? कॉंग्रेसने ज्याप्रकारे मध्य प्रदेशात महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव हे मूक होऊन का बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्याप्रकारे तेथील प्रदेशाध्यक्षांनी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्धल ते एक शब्दही का बोलत नाहीत. पहिले याचे उत्तर दिले पाहिजे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.