खेळ

टीम इंडियाला मोठा धक्का

  • भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव बुची बाबू स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. बांगलादेश दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी ही वाईट बातमी आहे. टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध मायदेशात कसोटी आणि टी-20 मालिका खेळायची आहे. भारत-बांगलादेश मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. क्षेत्ररक्षण करताना सूर्याला दुखापत झाली. कोईम्बतूर येथे मुंबई आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन XI यांच्यातील सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार यादव जखमी झाला. 
    या सामन्यात सूर्या केवळ ३८ चेंडूच मैदानावर राहू शकला आणि त्यानंतर तो दुखापग्रस्त झाला. या दुखापतीनंतर सूर्याच्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुलीप करंडक स्पर्धेला पाच सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सूर्या हा दुलीप ट्रॉफीमधील ‘सी’ संघाचा भाग आहे. मात्र, सूर्याची दुखापत किती गंभीर आहे आणि तो पुन्हा केव्हा मैदानात परतेल याबाबत कोणतीही माहिती नाही. 
    सूर्याला श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा टी-20 कर्णधार बनवण्यात आले होते. आता बांगलादेश विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी सूर्या उपलब्ध असेल की नाही याबाबत कोणतीही अपडेट मिळाली नाही. 

Related Articles

Back to top button