महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र त्या आधीच महाविकास आघाडीने निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. आमच्या १७५ ते १८० जागा निवडून येतील, असे महाविकास आघाडीने म्हटले असून दुसरीकडे महायुतीनेसुद्धा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक विधान केले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाईल, असा दावा त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.

Related Articles

Back to top button