महाराष्ट्र

झारखंडमध्ये ईव्हीएम ठीक, तर महाराष्ट्रात EVM खराब कसे?

  1. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणूक निकालांमध्ये महायुतीला महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळाले असताना, झारखंडमध्ये इंडिया आघाडी परतली आहे. पण, विरोधकांना महाराष्ट्राचा पराभव पचवता आलेला नाही. विरोधक ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. यासंदर्भात गोरखपूरचे खासदार रवी किशन यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, देशातील जनता पाहत आहे. हे लोक अशिक्षित लोकांसारखे बोलत आहेत. झारखंडमध्ये निवडणूक जिंकली तर ईव्हीएम ठीक आहे. महाराष्ट्रात निवडणुका हरल्या तर ईव्हीएममध्ये बिघाड आहे.
  2. राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. काँग्रेस आणि समस्त विरोधकांनी अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. भाजपच्या स्ट्राईक रेटसमोर काँग्रेस संपली आहे. काँग्रेस स्वतः बुडत आहे आणि सहकारी मित्र पक्षांनीही बुडवत आहे. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? यावर रवी किशन म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्वीच घोषणा केली होती की, तिन्ही पक्षांचे नेते बसून यावर निर्णय घेतील.

Related Articles

Back to top button