महाराष्ट्र

नवऱ्याला व्हिडिओ कॉल, दीदीचे तोंड शेवटचे पाहा

आजच्या धावत्या आणि आधुनिक जगात कित्येकांना जगण्याचा संघर्ष मोठा कठीण झाला आहे. जगासोबत चालण्याच्या स्पर्धेत आपण मागे राहतो की काय या भीतीचे भूत कायम मानगुटीवर बसून आहे. त्याच भीतीने आणि समाजातील आर्थिक असमतोलाने कित्येकांना मृत्यूच्या दारात उभे केले आहे. याच संघर्षाला तोंड देताना हतबल झालेल्या एका मातेने आपल्या चिमुकीलीसह जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यच्या निलंगा तालुक्यातील माळेगावात घडली आहे.
आपल्या मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह आपले जीवन संपवल्याची ही घटना आहे. मायलेकीचा या कारणाने जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भाग्यश्री व्यंकट हालसे (२६) व समिक्षा व्यंकट हालसे (५, रा. माळेगाव कल्याणी, ता. निलंगा) असे मयत मायलेकीचे नाव आहे.
माळेगावच्या व्यंकट हालसे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगा सार्थक व मुलगी समिक्षा अशी लोक होती. त्यांना त्यांना दीड एकर शेती आहे. मात्र, ती आई- वडिलांकडे आहे. शेळ्या राखून कुटुंबाची उपजिविका करत असल्याने हालसे यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती मोठी नाजूक आहे. दोन्ही मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न वडील व्यंकट करीत होते. दरम्यान, आपली दोन्ही लेकरे सीबीएसई इंग्रजी शाळेत शिकावेत, अशी इच्छा त्यांची पत्नी भाग्यश्री यांना होती. मात्र, परिस्थितीने ते शक्य होत नव्हते.
भाग्यश्री आपल्या पतीकडे वारंवार याबाबत बोलत असत. मुलांना सीबीएसई शाळेत पाठवण्याबद्दल आग्रह करत असत. तेव्हा पती समजूत काढून शाळेत पाठवू असे म्हणायचे. मात्र, त्यास उशीर होत असल्याने त्या नैराश्यग्रस्त झाल्या होत्या. त्यांना सीबीएसईच्या शाळेत घालण्याबद्दल अपेक्षा होती. पण ती हळू हळू पूर्ण होईल की नाही याची चिंता सतावत होती. अखेर त्यांनी आपल्या मुलीला सोबत घेऊन गावाबाहेर जात आपल्या मुलीसह आत्महत्या केली.
या घटनेत मुलाचाही मृत्यू झाला असता. मात्र, तो बचावला. कारण भाग्यश्री या घराबाहेर जात असताना त्यांनी मुलगा समर्थलाही हाताला आपल्यासोबत घेऊन जाण्याचे ठरवले होते. परंतु, समर्थ खेळण्यासाठी जायचे म्हणत आईच्या हातून निसटून पळाला. त्यामुळे तो बचावला.
दरम्यान भाग्यश्री यांनी पतीस व्हिडिओ कॉल केला. परंतु, इंटरनेट बंद असल्याने समजले नाही. त्यानंतर पुन्हा फोन आला आणि आईसोबत आले पप्पा, असे मुलगी म्हणाली. ते शेवटचेच बोलणं झाल्याचे वडील व्यंकट यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button