राजकीय

… तर १५ राज्यांतील भाजपची सरकारे कोसळतील

केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टात दुरूस्ती करण्यात येईल. त्यामुळे पक्षबदलू अपात्र ठरतील. त्या स्थितीत भाजपची १० ते १५ राज्यांतील सरकारे कोसळतील, असे भाकित कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केले. देशभरात फोडाफोडी करून भाजपने लोकशाहीची चेष्टा केली. मात्र, इंडियाची सत्ता केंद्रात आल्यानंतर पक्षांतराला बंदी घालणारे पाऊल उचलण्यात येईल. त्यामुळे चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जुलैपर्यंत भाजपची सरकारे कोसळतील, असा दावा खेडा यांनी केला.

मागील काळात विविध राज्यांतील अनेक आमदारांनी आपापले पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पक्षांतराच्या सत्राचा ठपका खेडा यांनी भाजपवर ठेवला. 

Related Articles

Back to top button