महाराष्ट्र

ब्रेकिंग! मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा, कारण…

पुण्यात अलीकडे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भटकती आत्मा’चा उल्लेख आपल्या भाषणात केला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. 

दरम्यान रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीही यावर भाष्य केले आहे. इंडिया आघाडी बिनकमी लढत आहे. राज्यात महाविकास आघाडी केवळ आरोप करत सुटले आहेत. आत्मे असतात. ते भटकत असतात. मोदी गुजरातचे आहेत. दिल्लीत असले तरी त्यांचा आत्मा देशभर आहे. लोकशाही धोक्यात आहेत असे म्हणतात, त्यांना माझा प्रश्न आहे की, लोकशाही धोक्यात आली असती तर मोदी मत मागायला आले असते का? असे आठवले म्हणाले. आठवले यांनी यावर कवितादेखील केली. 
आठवलेंची कविता- मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा.. कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा…

Related Articles

Back to top button