राजकीय

ब्रेकिंग! सोनिया गांधींची लोकसभेतून माघार

काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी आपल्या रायबरेली लोकसभा मतदासंघातील जनतेसाठी भावनिक पत्र लिहले आहे. सोनिया यांनी जयपूरला जाऊन राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे सोनिया लोकसभा मतदारसंघ सोडण्याची चर्चा सुरु होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुढची निवडणूक न लढवण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांना राज्यसभेसाठी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांनी रायबरेलीच्या लोकांसाठी पत्र लिहले आहे. सोनिया यांनी वाढते वय आणि आरोग्याचे कारण देत निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले.
माझे वाढते वय आणि आरोग्यामुळे मी पुढील निवडणूक लढणार नाही. या निर्णयानंतर मला तुमची सेवा करण्याची संधी मिळणार नाही. जसे तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला आतापर्यंत सांभाळले तसेच यापुढेही सांभळाल, असे आवाहन सोनिया यांनी रायबरेलीतील जनतेला केले आहे.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून आपला पराभव होईल या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा सुरू झाली होती. 

Related Articles

Back to top button