राजकीय

ब्रेकिंग! भाजपच्या किती कार्यकर्त्यांवर ईडीची कारवाई झाली?

आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रायगडमध्ये जनसंवाद दौरा सुरू आहे. आज पोलादपूर येथे उद्धव यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
रायगडने अनेकांना झुकवले आहे, तानाजी मालुसरे यांची ही भूमी आहे. इथं झेंडा बाजूला आणि नॅपकिन पुढं पुढं. जॅकेट घेतली पण काहीही झाले नाही, भावी पालकमंत्री म्हणूनच राहिले,  असे म्हणत उद्धव यांनी शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यावरही हल्लाबोल केला.
भाजपच्या किती कार्यकर्त्यांवर ईडीची कारवाई झाली? माझा पक्ष चोरला. आता माझ्या लोकांच्या मागे लागलेत, असा खोचक टोलाही उद्धव यांनी लगावला.

Related Articles

Back to top button