राजकीय
ब्रेकिंग! राष्ट्रवादी-भाजपने दिला काँग्रेसला दणका
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपने त्यांचा काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.
१८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीतला काँग्रेसला केवळ ४जागांवर विजय मिळाला. तर, भाजपने जोरदार मुसंडी मारत तब्बल १४ जागांवर विजय मिळविला. भंडारा येथे काँग्रेसचा ९ जागांवर विजय झाला. तर, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीने ९ जागांवर विजय मिळवला आहे. पटोले यांच्यासाठी बाजार समितीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. मात्र, राष्ट्रवादीने भाजपची साथ देत पटोले यांना त्यांच्या गृह जिल्ह्यात सत्तेपासून दूर ठेवले आहे.