महाराष्ट्र

संजय राऊत जेलमध्ये जाऊन बिघडले

जेलमध्ये राहून शिवसेना खासदार संजय राऊत बिघडले आहेत. आता महाराष्ट्र त्यांच्या बोलण्याला कंटाळला आहे. राऊत सरकार गेल्यापासून वायफळ बडबड करत आहेत, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
संजय राऊत, या महाराष्ट्राला विकास पाहिजे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तुम्हाला विकासाची काय अपेक्षा आहे, यावर बोललं पाहिजे. विरोधी म्हणून त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे. जो विकास थांबला आहे तो विकास करुन घ्यावा. सरकारला चांगल्या सुचना दिल्या पाहिजे. सरकारकडून चांगली काम करून घेतली पाहिजे ही विरोधकांची जबाबदारी आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

Related Articles

Back to top button