महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यपालांची गच्छंती अटळ ? कोश्यारींसह फडणवीस दिल्लीत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहे.
अनेक राजकीय नेते आणि संघटनांनी कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून राज्यपालांना परत बोलवा, अशी मागणी राष्ट्रपतींसह केंद्राकडे केली आहे. यानंतर आता एक माहिती पुढे आली आहे.
कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले आहे. या दौऱ्यात ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची भेट घेऊन राज्यपाल बदलीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता केंद्रीय नेतृत्व कुठला निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button