खेळ

बापरे! भारत हरला अन् एका क्षणात सट्टेबाजांचे बुडाले पाचशे कोटी रुपये

ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 वर्ल्डक स्पर्धेतून भारत बाहेर फेकला गेला आहे. काल सिडनीच्या मैदानात इंग्लंडविरुध्द झालेल्या सामन्यात टीम इंडियाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर 169 धावांचे लक्ष ठेवले होते. पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या इंग्लंडने एकही विकेट न गमावता हा सामना एकहाती जिंकला. परिणामी वर्ल्डकम जिंकण्याचे करोडो भारतीयांचे स्वप्न तुटले आहे.

या सामन्यादरम्यान आणखी एक घटना घडली आहे. भारताच्या पराभवामुळे भारतातील सट्टेबाजांना सुमारे 500 कोटींचा फटका बसला आहे. या सामन्याच्या तेराव्या षटकातच बुकींनी सट्टेबाजी थांबवली. इंग्लंडने जेव्हा भारतावर आक्रमण सुरू केली तेव्हाच सट्टेबाजांचे धाबे दणाणले.

या सामन्याच्या सुरुवातीला बुकींनी टीम इंडियावर भरपूर सट्टा लावला होता. परंतु दुसर्‍या डावात जसजसा भारताचा पराभव समोर दिसू लागला तसतसा सट्टेबाजांनी सट्टेबाजी करणे बंद केले. या व्यवहारातून सट्टेबाजांचे तब्बल 500 कोटी रुपये बुडाले, अशी प्राथमिक माहिती आहे.

Related Articles

Back to top button